*_टर्म इन्शुरन्स’ : आदर्श ‘कवच’ किती रकमेचे?_*
कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते. विमाधारक निश्चित स्वरूपाचा प्रीमिअम ठरावीक मुदतीसाठी भरतो आणि या काळात आकस्मिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबासाठी मोठय़ा रकमेची तरतूद करतो, असा आयुर्विम्याचा एक अतिशय सोपा प्रकार म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ होय. हा शुद्ध व निखळ स्वरूपाचा विमा प्रकार असून, अत्यंत कमी हप्त्यात, मोठय़ा रकमेचे विमा संरक्षणाचे कवच यातून मिळविता येते.
*_टर्म इन्शुरन्स कशासाठी?_*
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास माझ्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल. यामध्ये, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आदी जबाबदाऱ्यांना कवच दिले जाते. त्यामुळे विमाधारक अर्थात घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याच्या दाव्याचा उपयोग त्याच्या अपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी केला जाईल. तसेच, सध्याचे टर्म इन्शुरन्स योजना या आरोग्य (गंभीर आजार व अपंगत्व) आणि अपघाती मृत्यू यापासूनही संरक्षण देतात.
*_विमा संरक्षण विकत घेण्याचे काय फायदे आहेत?_*
भारतीयांची जीवनशैली बदलते आहे व यामुळे लहान वयात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. मी घरातील कमावती व्यक्ती असल्यास आणि मला गंभीर आजाराचे निदान झाल्यास माझ्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो. गंभीर आजारापासून आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्लानमुळे, अतिरिक्त आर्थिक भार न पडता माझ्या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांचा अतिरिक्त भार न पडता त्यांची नियमित जीवनशैली कायम राखणे शक्य होईल.
सध्या, विमा कंपन्या विम्याच्या दाव्याची रक्कम नियमित उत्पन्न म्हणून मिळण्याचा पर्याय वारसांना देतात. यामुळे कुटुंबांना त्यांच्या अर्थकारणाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते.
*_आदर्श कवच कोणते?_*
एक उदाहरण विचारात घ्या. मी ३० वर्षीय विवाहित, मूल असलेला पुरुष असून माझे मासिक उत्पन्न २५,००० रुपये आहे आणि गृहकर्ज म्हणून बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी रु. १० लाखांची परतफेड बाकी आहे. निवृत्तीचे वय ५८ वर्षे धरल्यास, मी आणखी २८ वर्षे काम करणार आहे. तर माझ्यासाठी आदर्श कवच पुढील प्रकारे मोजले जाईल : रु. २५,००० ×१२ महिने× २८ वर्षे + रु. १०,००,००० = ९४,००,००० रुपये. आदर्श कवचामध्ये सर्व जबाबदाऱ्या विचारात घ्याव्यात आणि हे कवच निवृत्तीच्या वयापर्यंत सुरू ठेवावे.
*_टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी कोणते मुद्दे विचारात घ्यावेत?_*
’ लवकर कवच घेणे : लवकर योजना खरेदी करणे म्हणजे कमी प्रीमिअममध्ये कवच निवृत्तीपर्यंत कायम राखणे.
’ क्लेम सेटलमेंट रेशो : विमा कंपनीने सातत्याने क्लेम सेटलमेंट रेश्यो उच्च राखला असल्याची, तसेच विनासायास क्लेम सेटलमेंट केल्याची खात्री करा.
’ नॉमिनेशन : योजनेसाठी वारस ठरवा, हा वारस योजनेचा लाभार्थी असेल.
’ सत्यनिष्ठता : स्वत:विषयी, प्रामुख्याने वैद्यकीय माहितीबाबत सर्व खरी माहिती द्या. यामुळे क्लेम सेटलमेंट सुलभ होईल.
’ आरोग्यविषयक दक्षता : वैद्यकीय चाचणीतून एखादी व्याधी व आरोग्यविषयक समस्या पुढे आल्यास, विम्यासाठी अधिक प्रीमिअम भरावा लागू शकतो. याचा अर्थ असा की, तुमच्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला आपोआपच आरोग्याबाबत अधिक सजगता व दक्षतेची गरज भासेल.
सौजन्य... टिम लोकसत्ता
*_टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे_*
जर तुम्हाला आयकर कलम ८०-सी अंतर्गत, रु.१.५० लाखापर्यंत गुंतवणूक करुन करबचत करावयाची असेल, तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणूक करावी. हे करणे अन्य सर्व आयकर कलम ८०-सी खालील गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच फायदेशीर असते, ते कसे ते आता समजून घेऊया.
भारतीय करकायद्या अंतर्गत करबचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. असे असुनही फारच थोडया व्यक्ती उपलब्ध असणा-या सर्व पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांच्या करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. ब-याचश्या व्यक्ती करबचतीसाठी कोणताही विचार न करता कोणत्यातरी दीर्घ मुदतीच्या साधनात पैसे गुंतवण्याऐवजी खरे म्हणजे अडकवत असतात. महागाईचा विचार केल्यास अशा साधनातून काहीच फायदा हाती लागत नाही. जेव्हा हे पैसे त्याच्या हातात परत मिळतात, तेव्हा त्या पैशांची खरेदीची क्षमता नगण्य झालेली असते.
उदा. जेव्हा तुम्ही करबचतीसाठी एखादी विमा योजना विकत घेता, तेव्हा त्यातील सर्वाधिक फायदा हा विमा एजंट कमिशनच्या स्वरुपात खाऊन टाकत असतो. तुम्हाला काय मिळते? तर अत्यल्प विमा संरक्षण. जर तुमचे काही बरे वाईट झाले, तर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमच्या वारसाची गरज भागवू शकणार नाही. तसेच मुदतपूर्तीनंतर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमची भविष्यातील आर्थिक गरजहि भागवू शकणार नाही. पारंपरिक विमा साधनातून मिळणारा परतावा हा, वार्षीक चक्रवाढीने ५% पेक्षा जास्त कधीच मिळत नाही. युलीपमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे अधिक नुकसान करून घेण्यासारखे आहे.
जर तुम्ही बँकेच्या पांच वर्षाच्या ठेवीत गुंतवणूक करत असाल तर, एक तर तुमचे पैसे ५ वर्षे अडकून रहातात, व दुसरे म्हणजे जे काही व्याज ६% च्या दरम्याने मिळते तेही करपात्र असते. आणि उरलेल्या लाभातून महागाईचा दर वजा केल्यास खरे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे सुरक्क्षित ठेवण्यासाठी, मिळणा-या अतिरिक्त फायद्यावर पाणी सोडत असता. अत्यंत थोड्या व्यक्ती कर बचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किमचा, गुंतवणुकीसाठी विचार करतात.
हे असे का घडते? सर्वसाधारणपणे याचे एक प्रमुख कारण म्हणजे करबचत व गुंतवणूक याबाबत असणारा गोंधळ किंवा अज्ञान किंवा दुर्लक्ष करणे हेच आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदार याबाबतचा निर्णय उशीरा म्हणजे अगदी मार्च महिना संपत आला की घेतो ते सुध्दा, जर त्याच्या कर सल्लागाराने सांगितले तर. किंवा एखादा एजंट त्याच्या हे गळी उतरवतो की “बाबारे, आता वर्ष अखेर आलेली आहे तेव्हा मी सांगतो त्याच साधनात (बहुतांशी विमा योजना) तू आता गुंतव”. तेव्हा तो याबाबतचा निर्णय घेतो. म्हणजेच आपण कोणत्यातरी कर बचतीच्या साधनात गुंतवणूक करुन मोकळे होतो व जेव्हा केव्हा पैसे परत मिळण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते की आपण फक्त कर बचतच केली बाकी हाती उरले एक मोठे शून्य.
हा परिणाम असतो कर व गुंतवणूक यातील वैचारिक गोंधळाचा. त्यामुळे होत काय, की विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे तो हमखास चुकीचा घेतला जातो. जेव्हा आपण कर बचतीसाठी किंवा अन्य कोणत्याही उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करतो तेव्हा त्या साधनाची आपण परिपुर्ण माहीती करुन घेतली पाहिजे.
यासाठी आपण गुंतवणूक कशासाठी करणार आहोत? त्याचे प्रमुख कारण काय? यातून मिळणारा फायदा किती? मिळणारा फायदा करपात्र आहे की करमुक्त आहे? पैसे किती काळ अडकून रहाणार आहेत? गुंतवणुकीसाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? व यातील मला कोणता पर्याय योग्य आहे? जर एजंट मार्फत गुंतवणूक करणार असाल तर त्याला किती कमिशन मिळते? ते कमिशन वाजवी आहे का? जाणारे कमिशन तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कमी करते काय? ही सर्व माहिती विचारपूर्वक मिळवून, लागल्यास त्यासाठी यातील खरोखर जाणकार असणा-या व्यक्तीची मदत घेऊन जर तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेतलात तर तुमच्यावर पश्चातापाची वेळच येणार नाही.
त्याचप्रमाणे करबचतीचा व गुंतवणुकीच्या निर्णयाची चाल ढकल करु नका. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला खरं म्हणजे माहीत असते की या वर्षी माझे एकूण उत्पन्न किती होणार आहे व यावर किती कर देय होणार आहे? जर आवश्यक असेल तर कर बचतीसाठी किती गुंतवणूक केली पाहीजे याचे नियोजन वर्षारंभीच करुन, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय करु शकता.
म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम हा अतिशय उत्तम पर्याय करबचतीसाठी आहेच पण गुंतवणूक करण्यासाठी सुध्दा आहे. जर तुम्ही या योजनांचा पुर्वेतिहास पाहीला तर या योजनेत एसआयपीव्दारे गुंतवणूक करणे हे नेहमीच फायदेशीर ठरलेले आहे. यातील प्रमुख फायदे म्हणजे लॉक-इन पिरिअड फक्त ३ वर्षे असतो. पहिली तीन वर्षे सलग गुंतवणूक करुन, त्यातूनच नंतर पैसे काढून पुनर्गुंतवणुकीचाही फायदा घेता येतो. गुंतवणूक करताना कोणतेही चार्जेस वजा होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. शेअर बाजारातील चढ उतार हे जोखीम न समजता संधीच समजली पाहीजे. चढ उतार आहेत म्हणूनच जास्त उत्पन्न मिळते. गेल्या २० वर्षात अशा योजनांनी वार्षिक सरासरी २०% चक्रवाढ पध्दतीने परतावा दिलेला आहे. हा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. निवृत्तीपर्यंत नियमितपणे या योजनेत (ग्रोथ ऑप्शनमध्ये) गुंतवणूक करत राहून, नंतर डिव्हिडंड पेआऊटचा पर्याय स्विकारुन, कायम स्वरुपी वार्षिक/मासिक कर मुक्त आकर्षक परतावाही मिळवू शकता. या योजनेतून मिळणारा डिव्हिंडंड वार्षिक सरासरी १२% किंवा अधिक मिळत असतो. यातील काही योजनांमध्ये ज्यानी २० वर्षापूर्वी गुंतवणूक केली आहे, त्याना गेले ७ ते ८ वर्षे दरवर्षी वार्षीक सरासरी ७०% या दराने लाभांश मिळत असून मुद्दलातही जवळपास ७ ते ८ पट वाढ झालेली आहे. गरज आहे ती चांगल्या योजनेची काळजीपूर्वक निवड करुन, त्या योजनेत नियमितपणे दरमहिना एसआयपी माध्यमातून दीर्घ काळासाठी विश्वासपूर्वक गुंतवणूक करत रहाण्याची.
तुम्ही निवडत असलेले गुंतवणुकीचे साधन हे प्रथम योग्य गुंतवणूक साधनच असले पाहिजे. म्हणजेच करबचतीच्या लाभाचा पर्याय नसला तरी गुंतवणूक करावी असे ते प्रभावी साधन असले पाहीजे. नंतर त्यात जर कर बचतीच्या लाभाचाही समावेश असेल तर तो दुग्ध-शर्करा योग समजला पाहीजे. आणि हे सर्वच म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम ला लागू पडत असते.
म्हणूनच प्रत्येक करदात्याने आयकर कलम ८०-सी अंतर्गत करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम योजनांचा वापर केला पाहीजे. सोबतच टर्म इन्शुरन्सव्दारे जास्तीत जास्त जेवढे विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे अवश्य घ्यावे. २८ वर्षाच्या व्यक्तीला मासिक साधारण रु.५०० ते ६०० म्हणजे दिवसाला २० रु. पेक्षाही कमी (२० रुपयात आजकाल एक कप चहाही मिळत नाही) भरुन एक कोटी रुपयाचे विमा संरक्षण मिळते. यासोबत थोडा जास्त हप्ता भरुन तुम्हाला जास्तिचे अपघात विमा संरक्षण, कायम स्वरुपी अंपगत्व संरक्षण इ. घेता येते. तसेच हा टर्म इन्शुरन्स नवरा व बायको या दोघांच्या नांवे संयुक्त घेता येतो, ज्यात एकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या विम्याची रक्कम मिळून उरलेल्या जोडिदाराचे विमा संरक्षणही पुढे चालू राहू शकते. परत टर्म इन्शुरन्सचा हप्ताही कलम ८०-सी अंतर्गत वजावटीस पात्र असतो.
*_गुंतवणुकीचा श्रीगणेशा …_*
नोकरी, व्यवसायाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तरुण, तरुणींना बचत व गुंतवणुकीबाबत फारशी माहिती नसते.
*_अशा नवगुंतवणूकदारांनी पुढील गोष्टी लक्षात घेऊन बचतीचा श्रीगणेशा करावा._*
*_खर्चाचा आढावा_*
आपल्या खर्चांवर नियंत्रण राखण्यासाठी व खर्चांचा मागोवा घेण्यासाठी बजेट निश्चित करणे आवश्यक असते. आपला सरासरी मासिक खर्च किती आहे व त्यातील किती रक्कम अनावश्यकपणे खर्च झाली आहे हे त्यातून लक्षात येते. सध्याच्या आधुनिक काळात यासाठी स्मार्टफोनमधील अॅप्सचाही वापर करता येतो.
*_२० टक्के बचत_*
एकूण उत्पन्नाचा पाचवा भाग म्हणजे २० टक्के रकमेची बचत करण्याचा प्रयत्न करा. हे प्रमाण अनेकांना मोठे वाटेल. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदारी व खर्चांचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दरमहा एवढी रक्कम जमा होत गेल्यास काही वर्षांनी भरीव निधी निर्माण होईल. या निधीच्या साह्याने आपत्कालीन निधी, गुंतवणूक निधी, कर्जहप्त्यांसाठीची तरतूद करणे शक्य होईल. एवढेच काय, यातून विदेशी ट्रिपचेही नियोजन तुम्ही करू शकाल. दरमहा विशिष्ट रकमेची बचत केल्याने तरुणपणी आर्थिक शिस्तही लागते.
*_कर्जाची परतफेड_*
शैक्षणिक कर्ज अथवा क्रेडिट कार्डचे पेमेंट बाकी असेल तर त्याची लवकरात लवकर परतफेड करा. नियमित बचत, अनावश्यक खर्चांना फाटा, तसेच, काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न यामुळेही कर्जांची लवकर परतफेड होऊ शकते.
*_आपत्कालीन निधी_*
कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आपत्कालीन निधी निर्माण करण्यासाठी नियमित बचत करा. अचानक नोकरी गमावणे, अनपेक्षित कौटुंबिक खर्च यावेळी हा निधी उपयोगी पडतो. हा निधी निर्माण करण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे आपल्या बचत खात्यामध्ये एकूण मासिक खर्चाच्या तीनपट रक्कम राखून ठेवणे.
*_गुंतवणूक_*
प्रत्यक्ष गुंतवणुकीस सुरुवात करण्यापूर्वी आधी सांगितल्यानुसार बचतीचा पाया भक्कम करा. कमी वयापासून केलेली गुंतवणूक दीर्घकाळात अतिशय फायदेशीर ठरते. कारकिर्दीच्या सुरुवातीला जोखीम घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे खात्रीशीर व पूर्वेतिहास चांगला असणाऱ्या *_म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा_*. यासाठी पुरेशी माहिती नसल्यास अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्या. याशिवाय, रिकरिंग, मुदत ठेवी, पीपीएफ, एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हे गुंतवणूक पर्यायही उपयुक्त आहेत.
*_करनियोजन_*
केवळ बचत व गुंतवणूक करू नका. या संबंधी प्राप्तिकराचे काय नियम, तरतुदी, वजावटी आहेत याचीही माहिती घ्या. करबचत करण्यासाठी कुठे व किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे, याची माहिती यातून तुम्हाला मिळेल. इंटरनेट अथवा मोबाइल अॅप्समध्ये टॅक्स कॅलक्युलेटरही उपलब्ध आहेत. त्यांच्या साह्याने आपल्या उत्पन्नावर किती कर आकारला जाऊ शकतो याचा आढावा घ्या.
धनलाभ....
*_योगेश पवार_*
सान्वी इंन्वेस्टमेंट
नेप्ती नाका , अहमदनगर
84 84 84 32 26
वाचन करा📕📗📘
व्यायाम करा💪💪💪
अर्थ साक्षर व्हा💸💸💸
*_पोस्ट आवडल्यास शेअर नक्की करा_*
No comments:
Post a Comment